संस्था

शंका समाधान

१. श्रींचा मठ उघडण्याची व मठ बंद होण्याची वेळ कशी आहे ?
श्रींचा मठ व आवार पहाटे ०४:३० वाजता उघडते व रात्री १०:३० वाजता गाभारा व ११.०० वाजता मठ आवार बंद करण्यात येते.

२. श्रींकरीता सोबत आणलेले वस्त्र, विविध पूजा साहित्य, नैवेद्य कोठे द्यावे लागेल ?
श्रींचे दर्शनाकरीता जात असतांना सोबत आणलेले पूजा साहित्य गाभाऱ्या मधील गुरुजींकडे देणे. मौल्यवान वस्तु असल्यास श्री चरणी अपर्ण करून, संस्थेच्या ऑफिस मध्ये जमा करून अधिकृत पावती घेणे.

३. मठातील खिचडीचा प्रसाद किती वाजता मिळेल ?
महाप्रसाद भक्तांना दररोज सकाळी ०७.००, दुपारी १२.०० व सायंकाळी ०६.३० वाजता आरती नंतर वितरीत करण्यात येतो. दर सोमवार आणि गुरुवार महाप्रसादाची वेळ दुपारी १२.३० ते दुपारी ०२:०० पर्यंत असते. दरमहा दुर्गाष्ट्मीस महाप्रसादाची वेळ संध्याकाळी ०५.०० ते रात्री १०.३० पर्यंत असते. दरवर्षी समाधी सोहळ्यानिमित्त वैशाख शुध्द दुर्गाष्ट्मीस भक्तांना दिवसभर महाप्रसाद देण्यात येतो.

४. श्रींचे पालखीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास कसे घेता येईल ?
मठामध्ये दर महिन्याची शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी साजरी केली जाते. दुर्गाष्ट्मीस तसेच गुरुपौर्णिमा, दत्तजयंती उत्सवाप्रसंगी श्रींच्या पालखीची परिक्रमा मठाच्या आवारात संपन्न होते. त्यावेळी आपणाला पालखीचे दर्शन घेता येईल.

५. नामस्मरण काय करावे व श्रींच्या उपासनेसाठी कोणता ग्रंथ वाचावा ?
मठात “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, हा जप केला जातो. उत्सवात “जयजय गुरुमहाराज गुरु जयजय परब्रम्ह सद्गुरू” असा जप वीणेवर केला जातो. तसेच नित्यपाठ, शंकरगीता, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, दासबोध, शिवलीलामृत, श्री गुरुलीलामृत आदी ग्रंथांचे पारायण केले जाते.

६. महाराजांच्या समाधीविषयी ?
समाधी कशी घेतली याची माहिती लिहिणे.

७. भक्तनिवासाची व्यवस्था आहे का ?
सध्या ट्रस्ट तर्फे भक्तनिवासाची सोय उपलब्ध नाही. परंतु परिसरात असलेल्या लॉज मध्ये राहण्याची सोय होऊ शकते.